*महाराष्ट्र विकास केंद्र आयोजित ज्ञानसमृद्धी व्याख्यानमाला, “युवकांनी अष्टपैलू बनणे ही काळाची गरज”-राजेंद्र घावटे*







मावळ मराठा न्युज -चिखली : “आज ज्ञान विज्ञानाची अनेक क्षेत्रे खुणावत आहेत. परिघाच्या पलीकडील शिक्षणाने व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होतो. युवक ही राष्ट्राची खरी संपत्ती आहे. आज देशापुढे अनेक आव्हाने आहेत. जगात सर्वाधिक युवकांचा देश म्हणून भारत ओळखला जातो. राष्ट्रप्रेमी आणि समजाभीमूक युवकच देशाचे भवितव्य उज्ज्वल करू शकतात. समाजविघातक शक्ती आणि व्यसनाधीनता या पासून दूर राहून युवकांनी कार्यप्रवणता जोपासावी. कुटुंबाचा आधार बनून समाजासाठी योगदान द्यावे. युवक व्यासंगी, जागरूक, बहुआयामी आणि अष्टपैलू बनला पाहिजे. ती आजच्या काळाची गरज आहे.” असे प्रतिपादन जेष्ठ व्याख्याते राजेंद्र घावटे यांनी केले. राजेंद्र घावटे हे चिखली येथील कॉनक्वेस्ट कॉलेजच्या ज्ञानसमृद्धी व्याख्यानमालेत द्वितीय पुष्प गुंफत असताना “समर्थ भारत आणि आजचा युवक” या विषयावर बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिल पाटील हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रसिद्ध व्याख्याते प्राचार्य प्रदीप कदम यांनी केले. “ज्ञानसमृद्धी व्याख्यानमाला शिक्षणापलीकडे विद्यार्थी घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे” असे प्रदीप कदम म्हणाले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध जलतज्ञ अनिल पाटील यांचेही मनोगत झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.अमोल कवडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.वैभव पताळे यांनी केले. विद्यार्थ्यांनी या व्याख्यानाचा मनमुराद आनंद घेतला. प्रश्नोत्तरांच्या मधून आपल्या शंकांचे निराकरण करू न घेतले.



